कोणी कितीही सीरिअलच्या नावाने आरडा ओरडा केला तरीही अश्या खूप कमी व्यक्ती असतील ज्यांनी एकही सीरिअल TV वर पाहिली नसेल.. कौटुंबिक सीरिअल साठी मात्र तमाम पुरुष मंडळीचा अपवाद म्हणता येईल.. पण खर सांगायचं तर आता आपल्या बाबांच्या वयाचे लोक सुद्धा आई लोकांमुळे एखादी सीरिअल तरी (चुकून ?) पाहतातच.. :) हं तर नमनाला घडाभर तेल म्हटल्यासारख मला काय सांगायचं आहे ते राहूनच गेल.. आता माझ्या मनातले काही निरागस प्रश्न मांडणार आहे... :)
       सीरिअलमधली हिरोईन ही नेहमीच खूप सरळसाधी अन्याय सहन वगरे करणारी, घरातल्या व्यक्तींची नको तितकी काळजी घेणारी, जे लोक तिच्याशी खूप वाईट वागतात त्याचं चांगल व्हाव म्हणून देवाला साकड वगरे घालणारीच का असते? त्याचं हे अति चांगल वागणं कधी कधी विचार करायला लावत की ह्यांना काही स्वाभिमान वगरे आहे की नाही? आणि ह्या सगळ्या त्यागाच्या मूर्तींना घरालेच काही लोक वेगवेगळ्या नात्यांच्या रुपात त्रास देत असतात. मजा म्हणजे ह्यांना माहीत असत आपल्याला कोण त्रास देऊ शकत आणि आधी पण त्रास दिलेला आहे तरीपण पुन्हा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या नेहमी का गोत्यात येतात? ह्यांना नॉर्मल लोकांसारखा राग वगरे का येत नाही? ह्यांना कधीच कोणाला धडा शिकवावा वाटतात नाही का?  :) 
          आधी असं होत की हिंदी सीरिअल मधे काहीही चालायचं.. जस की ज्याचं एकमेकांवर प्रेम असेल त्याचं एकमेकांशी लग्न होणार नाही दुसर्या कोणाशीतरी होईल... :) हिरो आणि हिरोईनला सावत्र बहिण किवां भाऊ असलेच पाहिजेत म्हणजे त्यांना त्रास सहजपणे देऊ शकतील. आणि इथे पात्रांचे कितीही वेळा लग्न होऊ शकतात अर्थातच वेगवेगळ्या व्यक्तीसोबत ... :) आणि अजून एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे एखादा मेलेला व्यक्ती अचानक जिवंत होणं किवां त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती परत त्याच कथानकात अवतरणं. हा डिरेक्टरचा फेवरेट ट्विस्ट आहे. :)  आता अतिशयोक्तीची कमाल म्हणजे आणि  medical science ची खिल्ली उडवणारा अजून एक प्रकार म्हणजे कोणत्याही character चा accident झाला की त्याची plastic surgery नक्की होणार. मग ती व्यक्ती नवीन ओळख घेऊन कथानकात येणार आणि स्वतःच्या अन्यायाचा बदला घेणार.. आणि हो plastic surgery झाली की ह्या व्यक्ती बारीक असेल तर जाड किवां जाड असतील तर बारीक होऊ शकतात.. त्यांची संपूर्ण अंगकाठी आणि हेअर स्टाइल वगरे सगळ काही बदलत... भारी आहे बुवा..!! :) आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मराठी मालिकांमध्ये सर्रासपणे आल्या आहेत. फक्त बदल इतकाच की पात्रांची नाव मराठी आहेत आणि ह्या सिरिअल्समध्ये  सगळे मराठी सण साजरे होतात :) पण ह्या सगळ्या सिरिअल्समध्ये नेहमी वाईटच गोष्टी का चालू असतात? नेहमी कट - कारस्थान का सुरु असतात?  कधी कधी इतक्या सारख्या गोष्टी २-३ मालिकांमध्ये सुरु असतात की पुढे काय होईल ते आपण सहज ओळखू शकतो... खरं सांगायचं तर ह्या सगळ्याचा आता वीट आला आहे.. कुठेही पहा तेच.. पण तरीही नवीन सीरिअल आली कि सगळेजण अशी अपेक्षा करतात कि कदाचित काहीतरी वेगळं असेल.. :)
               म्हणूनच आता सगळ्यांचा मोर्चा Reality Shows कडे वळला आहे. कारण इथे आपल्या काहीतरी knowledge मिळतं जरा मनोरंजन होते. काही खरोखर चांगले Reality Shows आहेत ते म्हणजे KBC, सारेगमप, Cookery Shows, Comedy Shows, Dance Competitions... आणि हो  Rodies  पण.. तितकंच काहीतरी वेगळं पाहायला मिळत त्यात.. पण आता ह्या shows मधे तोचतोचपणा येऊ नये नाहीतर पुन्हा कौटुंबिक सीरिअल मधे अडकलो तर डोक्याचा भुगा व्हायला वेळ लागणार नाही..   


This entry was posted on 9:26 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

2 comments:

    sayali said...

    Didi.. Pan itka sagla tula mahitiye mhanje tu pan saglya serials aawarjun pahates na... ;-)

  1. ... on October 13, 2011 at 10:01 AM  
  2. Sagar Kokne said...

    कैच्याकै मालिका असतात...मराठीतील चांगले कलाकार देखील यात आहेत हे पाहून फार वाईट वाटते.
    हे ही वाचून पहा- http://majhyamanatalekaahee.blogspot.com/search/label/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B2

  3. ... on December 21, 2011 at 4:44 PM