मृत्युंजय ही कादंबरी जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतली तेव्हा ती पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवताच आली नाही. अतिशय सुंदर आणि रोमांचक पद्धतीने कथा गुंफली आहे. शिवाजी सावंत ह्यांच्या छावा आणि युगंधर ही पुस्तके पण वाचली आहेत. पण मृत्युंजय ह्या पुस्तकाच वेगळेपण म्हणजे ह्यातली भाषाशैली…. हे पुस्तक खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. शिवाजी सावंत ह्यांना "मुर्तीदेवी" पुरस्कार मिळाला आहे मृत्युंजयसाठी. आणि हे पुस्तक नऊ भाषांमध्ये भाषांतरीत केले आहे. कर्णाच्या जीवनावर आधारीत अजून एक पुस्तक आहे राधेय पण मला खर सांगायचं तर मृत्युंजय जास्त आवडल आणि मनाला भावल…

            खूप सुंदर पद्धतीने सगळी कहाणी कर्ण ह्या एका योध्याभोवती फिरते जो सर्वगुणसंपन्न असूनही महाभारतात नेहमीच दुर्लक्षित राहिला. जात-वंश -कूळ ह्या गोष्टींना महत्व अगदी प्राचीन काळापासून आहे. कर्ण हा कुंती आणि सूर्याचा (कुंतीला लग्नाआधी झालेला) पुत्र होता. त्याला जन्मतः कवचकुंडले मिळाली होती ज्यांच्यात अद्भूत शक्ती होती. कर्णाला कुंतीने गंगेत सोडून दिले आणि तो एका भल्या माणसाकडे त्याचा मुलगा म्हणून वाढू लागला. कर्णाला त्याच्या जन्माच्या अजब रहस्यामुळे (कुंतिपुत्र असूनही तो एका सारथीचा मुलगा म्हणून वाढत असल्यामुळे) सगळीकडे आयुष्यभर अपमानित केले गेले. कर्णाला द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती पण ते फक्त क्षत्रियांनाच शिकवत असल्यामुळे त्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिला. मग त्याने परशुरामाकडे शिकायचे ठरवले पण त्याचा नियम असा होता की तो फक्त ब्राह्मणानाच शिकवत असे. पण कर्णाला त्यांच्याकडून ब्रम्हास्त्र शिकून घ्यायचे होते म्हणून तो खोटे बोलून परशुरामाचा शिष्य बनला. पण त्याचे खोटे उघडकीला आल्यावर परशुरामाचा नियम मोडल्यामुळे त्याने कर्णाला शाप दिला कि जेव्हा त्याला ह्या ब्राह्मस्त्राची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्याला ते आठवणार नाही.
       
           द्रौपदीचे स्वयंवर होते तेव्हा तिथे पांडव, कौरव आणि कर्ण असे सगळे आले होते. पण कर्ण समोर येताक्षणी तिने "मी सूतपुत्राला वरणार नाही" असा सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला. कर्णाच्या ह्या सगळ्या जीवनात त्याची प्रेमळ अर्धांगिनी वृषाली नेहमीच त्याच्यासोबत होती. त्याच्या जीवनातल्या कटू प्रसंगांची तीव्रता वृषालीने केलेल्या हळुवार प्रेमाच्या वर्षावाने कमी झाली. कर्ण त्याच्या संसारीक जीवनात सुखी आणि समाधानी होता.

           कर्णाचा दानशूरपणाची सगळीकडे ख्याती होती. कोणीही याचक कर्णाकडे आल्यावर रित्या हातांनी जात नसे.  महाभारतातील शेवटचे युद्ध सुरु होण्याआधी कुंती कृष्णासोबत त्याच्याकडे आली व तिने तो तिचा पुत्र असल्याचे सांगितले. आणि त्याला पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी विचारले. सगळ्यांकडून अवहेलना मिळालेल्या कर्णाला फक्त दुर्योधनाने जवळ केल्यामुळे तो शेवटपर्यंत दुर्योधनाशी मैत्रीच्या नात्यामुळे प्रामाणिक राहिला. पण त्याने वचन दिले की पांडवांपैकी तिचा एक तरी पुत्र जिवंत राहील. त्याने आपली कवचकुंडलेपण कुंतीला देऊन टाकली. कर्णाच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी एका इंद्र याचकाचे रूप घेऊन आला. कर्ण नुकताच अंघोळ करून आल्यामुळे त्याच्याजवळ काहीच नव्हते तेव्हा इंदाने त्याच्याकडे आर्थिक मदतीची याचना केली. तेव्हा सगळे काही कळूनही थोडाही विचार न करता त्याने आपला सोन्याचा दात फोडून त्याला दिला.

          अश्या ह्या कर्णाला इतक्या सगळ्या गोष्टी असूनही अहंकारी असल्याचे म्हटले गेले. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर कर्णाबद्दल आपण हळुवार होतो. त्याच्याकडे आणि महाभारताकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळते. जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये ब्रह्मास्त्र न आठवल्यामुळे शेवटच्या क्षणी अर्जुनाकडून अंत होतो तेव्हा मन आतून हेलावते. असा हा कर्ण - एक चांगला पुत्र, चांगला पती, चांगला मित्र आणि सर्वगुणसंपन्न योद्धा आपल्या मनातून कधीच पुसला जात नाही.….


              एखाद्या movie बद्दल लिहिण्याची तशी माझी पहिलीच वेळ… हा movie पाहायला जाताना माझ्या मनात आधीच काहीही expectations नव्हते त्यामुळे जे समोर आला ते सगळ एक मस्त surprise होत अगदी पहिल्या scene पासून ते शेवटच्या scene पर्यन्त. मला हा चित्रपट खूप आवडला  म्हणून इथे लिहितीये… ह्या movie ची story खूप खास किवा वेगळी अशी नाहीये.  ह्यामध्ये सुद्धा २ भावाचा सत्तेसाठी असलेला संघर्ष दाखवला आहे. पण हा movie आवडण्याचे मुख्य कारण आहे त्याची मस्त Cinematography जी आतापर्यंतच्या कोणत्याही सिनेमापेक्षा नक्कीच वरचढ आहे. ह्या सिनेमातले action sequence खूप जबरदस्त आहेत. साधे साधे सीन ज्या grand scale वर मांडले आहेत त्यासाठी director ला मनापसून thanks ज्यामुळे इतका चांगला movie आपल्यासमोर आला. सगळ्यांची वेशभूषा पुराणकाळातील आहे आणि त्या काळातले वातावरण खरोखर आपल्यासमोर उभे रहाते. ह्या movie मधे खूप मोठ्ठा आणि सुंदर धबधबा दाखवला आहे. ही कमाल graphic ची आहे हे माहित असूनही तो खरा वाटतो. आणि युद्धाचे scenes खूप मस्त दाखवले आहेत. युद्धाच्या मैदानात एकाच वेळी खूप गोष्टी सुरु असतानाही आपला गोंधळ न उडता आपण तिथले सगळे special effects enjoy करू शकतो. आणि जिथे movie म्हणजेच हा पहिला भाग संपतो, तो scene खूप चांगला निवडला आहे ज्यामुळे आपली उत्सुकता सुरु होते पुढचा भाग पाहण्यासाठी. 
          हा चित्रपट मूळ तेलगु आणि तमिळ भाषेत तयार झाला असून त्याला हिंदी, मल्याळम आणि फ्रेंच मध्ये डब केले आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात south style दिसून येते. ह्या चित्रपटाचे २ भाग आहेत ज्यातला एक भाग जुलै मध्ये प्रदर्शित झालेला असून दुसरा भाग जानेवारी २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्या पूर्ण चित्रपटाचे काम ३ वर्ष चालू होते आणि जवळपास २५० कोटी हा movie बनवायला लागले आहेत.  सध्याच्या news प्रमाणे ह्या चित्रपटाच्या पहिल्या भागानेच ५०० कोटीचा आकडा पार केला असून अजून दुसरा भाग यायचा बाकी आहे. :)

 मी इथे movie ची story सांगणार नाहीये फक्त मला त्यात काय आवडल ते सांगणार आहे.

 प्रभास ह्या movie मध्ये बाहुबली आणि शिवा अश्या double role मधे  दिसला आहे. प्रभासने ह्या दोन्ही भूमिका खूप चांगल्या निभावल्या आहेत. संपूर्ण चित्रपटात त्याने ह्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. उत्तम वेशभूषा, चांगला अभिनय, उच्च प्रतीच्या techniques, आणि special effects ने तयार झालेले action sequences ह्यामध्ये ह्या दोन्ही roles मस्त वाटले आहेत.
               
राणा ने भल्लालदेव हा grey shade असलेला role खूप चांगला केला आहे. आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे character सुद्धा hero सारखे सर्व आघाड्यावर सर्वगुणसंपन्न दाखवले आहे. फक्त hero ची प्रजेविषयीची आत्मीयता आणि त्याची चांगली वृत्ती त्याला सर्वार्थाने नायक बनवते. राणाने Bollywood मध्ये  "दम मरो दम" हा movie केला आहे.

 तम्मना ने अवन्तिकाचा role केला आहे. पूर्ण चित्रपटात ती खूप सुंदर दिसली आहे. तिचा role खूप मोठा नाहीये पण तिने movie मधे action scenes चांगले perform केले आहेत.


 अनुष्का ने बाहुबली(प्रभास) ह्या पात्राच्या पत्नीची आणि शिवा(प्रभास) ह्या पात्राच्या आईची भूमिका निभावली आहे. movie मधे ती आपल्या मुलाची वाट पाहत असते तेव्हा करण अर्जुन सिनेमातल्या राखी ची आठवण येते. :P पहिल्या भागात तिचा  role तसा कमी आहे पण बाहुबलीच्या पुढच्या भागात बहुतेक तिची कथा मांडली आहे.

 सत्यराज नावाच्या अभिनेत्याने कट्टापा हा role केला आहे. जे लोक Whats-app वापरतात त्यांना हे नाव माहित नाही असे होणार नाही कारण कट्टापाच्या messages ने खूप धुमाकूळ घातला होता. ह्या अभिनेत्याने हा role संपूर्ण ताकदीने निभावला आहे. director ने त्याचा पेहराव, त्याचे dialogues आणि त्याची बोलण्याची आणि चालण्याची पद्धत ह्या सगळ्यावर मेहनत घेतली आहे.

 राम्या ने शिवगामी चा role खूपच चांगला केला आहे. राजमातेचा म्हणजे भल्लालदेवच्या आईचा म्हहत्वाचा role तिने केला आहे. तिच्या role मधे - राजकारणी धोरण असलेली, मुत्सद्दी, शिस्तप्रिय, तडफदार  आणि न्यायाने वागणारी स्त्री असे विविध पैलू आहेत. तिच्या संपूर्ण पेहरावावरून आणि चित्रपटातल्या वावरामध्ये राजघराण्यातला डामडौल आणि तेज दिसून येते.



ह्या movie ची सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे Hollywood ची बरोबरी करेल अशी Cinematography. हा movie पाहून नेहमीच्या typical Bollywood मसाला movies मधून ब्रेक मिळतो. आणि सगळे special effects खूप मस्त shoot केले आहेत. सगळ्यांनी हा movie एकदा तरी पाहावा.