मॅच delay झाल्यामुळे आम्ही जरासे गोंधळून गेलो. काय झाले ते कळत नव्हते. मग लगेच सगळ्याना फोन करून विचारत होतो की काय झाले आहे? News channels तर नक्कीच काहीतरी सांगत असतील.... तेव्हा सगळ्याना SMS येत होते आणि कळाले की stadium च्या बाहेर 2 ब्लास्ट झाले आहेत. मग लगेच घरच्यांचे आणि friends चे फोन येणे सुरू झाले की आम्ही सुखरूप आहोत की नाही ..... काय सुरू आहे इकडे? आम्हाला मधे काहीच कळत नव्हते आणि काही धोका पण नव्हता. कारण इथे सुरक्षा खूप कडक होती. आम्हाला वाटला की आता मॅच cancel झाला तर? सगळे पैसे आणि मेहनत पाण्यात आणि मूडची पण वाट लागेल. पण नंतर कळले की मॅच 1 तास उशीरा सुरू होणार आहे. हे कळल्यावर मग आमचा जीव भांड्यात पडला. :)
           हे सगळे गोंधळ सुरू असताना माझे निरीक्षण चालू होते आजूबाजूला..... पूर्ण stadium माणसानी भरून वाहत होते. सगळ्यांसोबत आम्ही पण मॅचचा माहोल आणि प्रचंड गर्दीची मजा घेत होतो. मॅच सुरू व्हायच्या आधी खेळाडूंचा ground वर सुरू असणारा सराव पण पाहायला मिळाला. थोड्याच वेळात (IPL च्या बरोबरीने प्रसिद्धी मिळालेल्या) दोन्ही teams च्या CHEER GIRLS ची entry  झाली. सगळ्या प्रेक्षकानी त्यांचे जोरदार स्वागत केले. मला पण त्यांना जवळून पाहायची इच्छा होतीच... :)   खरच त्या सही होत्या...!!! :D
          आणि एकदाचा मॅच सुरू झाला. इतके लोक आणि इतका उत्साह बघून लगेच कळत की आपल्या देशात क्रिकेट इतका का favorite game आहे ते.. :) Live मॅच पाहण्याची मजाच काही वेगळी असते. कधी कधी विश्वास बसत नाही की आपले आवडीचे players तिथे आपल्या डोळ्यासमोर खेळत आहेत. MI ची batting पहिल्यांदा होती. सगळेच सचिन च्या खेळीकडे डोळे लाऊन बसले होते. पण सचिन ह्या मॅच मधे लवकर आउट झाला त्यामुळे जरासा मूड गेला. पण बाकीच्यांनी चांगली खेळी केल्यामुळे  एकूणच MI ची धावसंख्या जबरदस्त झाली होती. चांगल्या चौकारांमुळे आणि षट्कारांमुळे सगळे stadium दनाणून गेले होते. RCB  ने सुद्धा चांगली खेळी करायचा प्रयत्न केला पण  एकामागोमाग एक सगळे आउट होत गेले आणि MI चांगल्या फरकाने हा मैच जिंकले.
          हा शनिवार मनसोक्त enjoy करून आम्ही बाहेर पडलो. घरी जाताना तूफ़ान पाऊस होता. तसेच भिजत भिजत घरी गेलो. घरी पोचायला जवळपास 9.30 वाजले होते. दिवसभर इतक थकूनही काहीच थकवा जाणवत नव्हता. आणि असा आमचा  शनिवार काहीही ठरवलेला नसताना IPLमय झाला. :)
अरे हो माझ्याकडून "Mumbai Indians" ला final मॅच साठी भरभरून शुभेच्छा...!!!


   
              
              सध्या सगळीकडे IPL चे वारे वाहत आहे. आणि आशिषला मॅच तुफान आवडत असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा मॅच पाहिला नाही  असा एकही दिवस जात नाही. मी फक्त 2  Teams ना मनापासून support करते.... "Mumbai Indians" आणि "Royal Challengers Bangalore (RCB)" (बंगलोरला रहात असल्यामुळे करत असेन कदाचित  :) ) IPL चा live मॅच बघण्याची आमची खूप इच्छा होती. म्हटला की शनिवारचा 17 एप्रिलचा मॅच  बघावा कारण तो MI आणि RCB मधे होता... तो पण बंगलोर मधे..... पण लवकर tickets book  न केल्यामुळे मॅच बघण्याचा विचार आम्ही सोडून दिला होता.
           अचानक गुरुवारी आशिष म्हणाला की त्याच्या काही friends ना पण हा मॅच पाहायचा आहे... tickets कोणाकडेच नाहीयेत.... आपण जाऊन तर पाहूया कुठून tickets मिळवता आली तर मॅच पाहू नाहीतर येऊ घरी....
           मग शनिवारी सकाळी आम्ही नाश्ता केला. पटकन काही महत्वाची काम करून stadium कडे निघालो. रस्त्यात आमच्यासोबत मॅच पाहायला येणारा friend पण आम्हाला join झाला. आणि एकजण तिकडे पोचला होता आणि आमची वाट पाहत होता.  आशिषकडे असणारा RCB चा T-Shirt आम्ही सोबत बॅग मधे घेतला होताच.... (अरे हो आशिषच्या supporting list  मधे आधी RCB आणि नंतर MI आहे. ) मी  MI ला support करत असल्यामुळे मला  MI चा T-Shirt हवा होता. पण असे ठरवले की tickets  मिळाले तर घेऊ. मॅच ची वेळ 4 वाजताची होती. पण tickets मिळवायचे असल्यामुळे आम्ही दुपारी 12 वाजताच बाहेर पडलो होतो.
           आणि शेवटी काहीतरी करून (समझनेवाले को इशारा काफी है ) :) tickets मिळवले एकदाचे...... !!! इतका आनंद झाला तेव्हा की बस... जग जिंकल्यासारखे भाव होते चेहर्यावर...... मग लगेच ठरल्याप्रमाणे माझ्यासाठी MI चा T-Shirt घेतला. आणि अशी सगळी जय्यत तयारी करून आम्ही 3 वाजता मधे पोचलो. मग लगेच घरी दोघांच्याही आई बाबाना फोन करून आम्ही इथे आल्याचे सांगितले. (कारण तोपर्यंत कोणालाच सांगितले नव्हते.) मग सगळ्या friends ना पण ही आम्ही इथे असल्याचे कळवले. पण सगळा मनासारख कस घडेल ना? थोड्याच वेळात ground वरती board झळकत होता.. "MATCH DELAYED ". :(

क्रमश:





प्रत्येक वेळेस पाऊस आला की आठवणी सोबत घेऊन येतो अस मला वाटत..... काल दुपारी मी ऑफीस मधे असताना बाहेर पाहिल तर मस्त पाऊस पडत होता. जस तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर वाटेल तसच वाटत जेव्हा आपण उन्हाने वैतागलेले असतो आणि अचानक पाऊस येतो....
पाऊस आला की मस्त गोष्टी सुचायाला लागतात. मला पाऊस पडताना काही गोष्टी खूप कराव्याश्या वाटतात.

१. आधी पटकन जाऊन पावसात भिजण.... (थोडस तरी....)

२. प्लेट मधे गरम गरम कांदाभजी आणि हातात चहाचा वाफाळता कप घेऊन घरातून पाऊस पाहाण......

३. जर बाहेर असू तर मुसळधार पावसात पाणीपुरी खाण्याची मजा काही औरच असते.....

४. खूप पाऊस पडत असताना आइसक्रीम खाण......

५. आपल्या आवडत्या व्याक्तिबरोबर भर पावसात भटकण........

६. रात्रीची वेळ असेल तर अंगावर रजई घेऊन हातात एखाद मस्त पुस्तक घेऊन पावसाचा आवाज ऐकत बेडवर पडून रहाण....

७. पाऊस पडत असताना एखादी मस्त गझल लावून पावसाचा आस्वाद घेण..

८. जर सुट्टीचा दिवस असेल आणि डोळे उघडतानाच खिडकीतून पाऊस दिसत असेल तर पुन्हा रजई मधे शिरून अजून थोडावेळ झोपण... (ज्याना सकाळी झोपायला आवडत त्यानाच ह्यातल सुख कळेल. ..)

९. जर पावसाचा अंदाज असेल तर सगळ्यांचा ग्रूप बनवून ट्रेक वर जाण....

यापैकी एखादीतरी गोष्ट प्रत्येकाने केली असेलच.... आणि जर नसेल केली तर लवकरच करता येणार आहे कारण पावसाळा आता जवळ येत आहे म्हटल..... :)