१०-१५ मिनिटांमध्ये आम्ही कॉटेजमध्ये पोचलो. खूप सुस्ती आली होती. आशिषने मला आधीच TV असलेली रूम चालेल (म्हणजे हवी आहे) असा बुक करताना मला सांगितलं होत. :) मग World Cup match मधे काय सुरु आहे ते जरास पाहिलं. ५ च्या आसपास तयार होऊन आम्ही पुन्हा बीचवर जाण्यासाठी निघालो. आम्हाला Sunset घालवायचा नव्हता. तिथे मी माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली... ती म्हणजे मी तिथे बीचवर वाळूमध्ये माझं आणि आशिषच नाव लिहिलं. :) आणि वाळूमध्ये काढलेली अजून एक कलाकृती....

                                                   
पाण्यामध्ये बरंच आतमध्ये मला जावसं वाटत होत. पण वेळ जरा भरतीची असल्यामुळे फारस आतमध्ये मी गेले नाही. तिथे बीचवर राईड मारण्यासाठी एक मस्त घोडागाडी होती. काहीजण तिथे मस्त राईड घेत होते. ते पाहून मला एकदम जुन्या हिंदी movie मधले scenes आठवले. :) आम्ही तिथे मनसोक्तपणे sunset चे फोटो काढले. काही मुल तिकडे cricket खेळत होते. लगेच मनात विचार आला की मोठ्ठा group मिळून आलो असतो तर नक्कीच खेळलो असतो इथे... :)   




           आम्ही होळी-रंगपंचमीच्या विकांताला गेलो होतो म्हणून तिथे एक मज्जा पाहायला मिळाली. फिरायला आलेले आणि गावातले लोकसुद्धा कोरडा रंग एकमेकांना लावत होते आणि सरळ समुद्रामध्ये घुसत होते. :) लहानपणी आम्ही कोणाला त्रास द्यायचा असेल तर एक पूर्ण बादलीभरून रंगीत पाणी करायचो आणि त्याच लक्ष नसताना अचानक अंगावर टाकायचो.... पण इथे तर अक्खा समुद्र होता. असाच मनात एक मजेशीर विचार आला की पूर्ण समुद्रच रंगवून टाकला तर? जस की पूर्ण गुलाबी,हिरवा किवा आपल्या आवडत्या रंगाचं समुद्रच पाणी... :)) sunset चे फोटो काढताना खूप मज्जा आली. मी सुर्यासोबत खूप मस्त फोटोस काढले. जस की सूर्याला खाताना... डोक्यावर घेतलेला... हातावर घेतलेलं... बोटांमध्ये पकडलेलं... हळूहळू समुद्र अस्ताला जायला लागला. आणि मग शेवटी पूर्णपणे समुद्रामध्ये बुडून विझला. :)


           मग थोडावेळ आम्ही तिथे निवांत गप्पा मारत बसलो. अंदाजे रात्री ८ च्या आसपास आम्ही कॉटेजमधे परतलो. दुपारी खूप जास्त जेवण झाल्यामुळे आम्हाला फारशी भूक नव्हती. म्हणून मग आम्ही जिथे राहिलो होतो तिथेच असलेल्या काकूंकडे आम्ही फक्त पोहे आणि चहा घेऊ असे सांगितले. रात्री तितकच खाऊन मस्त पोट भरलं. आणि मग सुमुद्राची गाज ऐकता ऐकता कधी डोळा लागला ते कळलच नाही...
           सकाळी लवकर उठून मस्त उपमा आणि सोलकढीचा नाश्ता केला. कॉटेज आम्ही ठरल्याप्रमाणे १० वाजता सोडलं. पुन्हा एकदा बीचजवळून आमच्या कारमधून राईड मारली. समुद्राला मनात साठवून ठेवलं आणि पुन्हा एकदा यायचं असा ठरवून आम्ही दिवेआगरला निरोप दिला. :)
                                                                                                                                                           समाप्त


This entry was posted on 10:35 AM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

1 comments:

    Sayali said...

    Photos mast aale aahet aani rangpanchmichi maja aathawun chan watla.. Kadhitari samudra pan rangeet karun taaku! ;-)

  1. ... on May 15, 2011 at 9:49 PM